" बिल गेट" (Bill
Gates) चे
भारतीय लोकांविषयी मत...
"बिल गेट" (Bill
Gates) चे
भारतीय लोकांविषयी मत...तो म्हणतो,"भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे.या देशातील मंदिरातील घंटा जरी
विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो, परंतु
, मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील लोकांना आपण गुलाम आहोत
हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या
करतो...। कारण, त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे
हेच त्याला कळत नाही ...। या देश्यातील गरीब जनतेला कळतनाही कि तुमच्या गरिबीला
कोण जबाबदार आहे? इथल्या तरुणालाकळत नाही तुमच्या
बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?मग
कसा बदल होणार...?कोण करणार...? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते? केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? सोने
-चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव... काय उपयोग सांग मानवाअशा या दान धर्माचा ? कधी शेतक-याला बियाणंदान देऊन बघ...
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन
बघ... कधी एखाद्या उपाश्याला घlस
भरवुन बघ... कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ... कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार
करून बघ... कधी एखाद्या वृध्दाश्रमासदान करून बघ.... एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून
बघ... एकदा दान धर्माच्या व्याख्याबदलून तर बघ !! जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये
जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल... पुस्तकानं
माणसाच मस्तक सशक्त होत... सशक्त झालेलं मस्तककुणाच हस्तक होत नसत... आणि हस्तक न
झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत मात्र
सोन्याचे ? शाळेत आज मुलांना बसायलासाधी फरशी नाही
मंदिराला मात्र संगमरवरी?
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा
चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही... आपला
भारत नक्की महासत्ता होणार?
पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि भाजीपाला
फूटपाथवर...म्हणे आमचा देश कृषी प्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी... शेकडो मैल
चालतो वारकरी... अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!
